मनाची
निगरगट्ठ गाठ पाडून
आठवणींचं
कायमस्वरूपी बोचक
खोलवर कुठेतरी
क्षणांच्या अडगळीत
डांबून ठेवतो
आम्ही...
पावसाच्या
असंच कधितरी
मुसळधार
बरसल्याने
मग अचानकच होऊ लागतो
आम्हास भूतप्रीतीचा
अभूतपूर्व आभास...
अपेक्षांचे
असंख्य ओंडके
आसवांच्या बेफाम समुद्रात
वाहावत जाण्याची
आम्हाला
अजूनही वाटतच असते
अनेकवेळ एक
अनावृत्त भीती....
मर्मस्पर्शाचे
अनेक अगणित डोहाळे
घेऊ लागतात आमच्या
नेत्र पालव्यांमध्ये
त्यांना हवा तसा
महाकाय
शाकार...
विचार आणि विकारांची
अविरत घुसळण
त्याच त्या वाटेचा
असम्बद्ध आढावा,
तरीही,
स्वप्नांच्या निलसागरात
हिंदोळत असतो
आमचा हिकमती
पडावं....
आयुष्याचा
'सिसिफस' होत असतांना
सोबतीने असलेली
अशी अनासक्त जीविशू
एवढाच काय तो
आमच्या जीविताच्या
भावसभेचा
मूलाधार...
नीरज पुरुषोत्तम चौधरी
1/05/2017
No comments:
Post a Comment